श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

गुलाम रसूल भट, त्यांचा मुलगा आणि दोन मुली सोमवारी रात्री हंदवारा येथील राजवार भागात पिण्याचे पाणी आणण्यासाठी घरातून निघाले असताना कंचकी गावात त्यांचा अपघात झाला, असे वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.